वीज नव्हती म्हणून जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या तरुण जोडप्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील आंचलगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पूजा निलेश शिंदे (वय २२) आणि नीलेश रावसाहेब शिंदे (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.
यासंबंधी माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी आचलगाव परिसरात वीज नव्हती. त्यामुळे पंप सुरू करून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करणे शक्य नव्हते. सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही वीज न आल्याने पूजा व नीलेश शिंदे यांनी आपल्या शेतातील तळ्यातून पाणी आणण्याचा निर्णय घेताला.
त्यासाठी दोघेही तळ्यावर गेले. शेततळ्याला प्लास्टिकचा कागद असतो. पाणी काढताना ते घसरून आत पडले असावेत. बराच काळ झाला, ते परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली.
याची माहिती मिळताच कोपरगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. शेततळ्यातील पाणी कमी करून ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…