सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलाय. कारण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं. तसेच अधिकार नसतांना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने असे आरक्षण दिल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं होतं.
मात्र मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे की, सर्व आरक्षण देण्याचे अधिकारी राज्य सरकारलाच आहे. त्यामुळे ह्या सर्व मुद्यांच्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आल्याचं विनोद पाटील म्हणाले.
तर याचवेळी राज्य सरकारला विनंती करताना विनोद पाटील म्हणाले की, जे-जे करावे लागेल, जश्या-जश्या पद्धतीने मांडणी करावी लागेल, ते-ते राज्य सरकारने करावे. तसेच पुन्हा एकदा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी विनंती विनोद पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…