मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ‘राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालंय. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय चाललंय ते चांगलं चाललंय’ असं म्हणत माजी खासदार राजू शेट्टींनी शेलक्या शब्दांत टीका केली.
आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका ड्रग्स पेडलरसोबतचा फोटो ट्वीट केला आहे. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पेठ इथं पत्रकारांशी बोलत असताना राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.
‘आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत हेच या टोळीयुद्धातून राज्यातील जनतेला कळत चाललंय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
तसंच, आज महाराष्ट्रातील शेतकरी, पाऊसाची अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे, त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशातच या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोन्ही पक्षांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय. शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्नाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी एकमेकांवर आरोप करत राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे, अशी टीकाही राजु शेट्टी यांनी केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…