पाकिस्तान आणि चीन भारताविरोधात नेहमीच कुरापती करत आलेत. मात्र आता या देशांकडून भारताला जैविक हल्ल्याचा धोका आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय.
एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे सीमेवर चीन, पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती. त्यात आता एका नव्या संकटाची चाहूल लागलीय. येत्या काळात भारताला जैविक हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत.
जैविक हत्यारांच्या निर्मितीसाठी खतरनाक व्हायरस तयार केला जातोय. याचा मुकाबला करण्यासाठी भारताला नवी रणनीती तयार करावी लागेल असं डोवाल यांनी म्हंटलंय.
अजित डोवाल यांचा रोख सरळसरळ चीनकडे आहे. आधीच कोरोनामुळे जगाच्या नजरेत चीन आरोपीच्या पिंज-यात आहे.
अशातही चीनच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये जैविक हल्ल्यांसाठी विषाणू बनवले जात असल्याचं वृत्त याआधीही समोर आलंय. त्यामुळे भारतानं वेळीच सावध राहायला हवं. कारण भविष्यातलं युद्ध हे शस्त्रांचं नसेल तर ते जैविक युद्ध असेल.
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…