एखाद्या आठवड्या-पंधरवड्यात एखादा तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,कोतवाल यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केल्याची बातमी नाही आली कि या राज्यातील जनतेलाही आता काही तरी चुकल्या सारखे वाटत असते, इतकी टोकाची लाचखोरी फेरफार नोंदी आणि सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी या राज्यात होते कि काय असा प्रश्न कायम जनतेला पडलेला असतो.राज्यात लाच लुचपत विभाग वेळोवेळी कारवाई करत असताना देखील लाचखोरीचा हा प्रकार काही थांबताना दिसून येत नाही.एकूणच लाच लुचपत विभागाने सापळा रचून कारवाई करूनही या प्रकरणी प्रत्यक्ष कोर्टखटल्यात निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठे असल्याच्या करणाचीच चर्चा होते.
लाच स्वीकारण्यात महिला कर्मचारीही मागे नसल्याचे दिसून येत असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका तक्रारदाराच्या आजोबाच्या निधनानंतर वडील आणी काकाचे नाव सात बारा उताऱ्यावर नोंद धरण्यासाठी तलाठी स्वाती झुरळे यांनी कोतवाल संदीप तांबे यांच्यामार्फत ४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…