ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले….

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

तसेच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली.राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

रुग्णसंख्या कुठे वाढत आहे ? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लाने पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

निर्बंध कधीपासून कडक होणार ?

राजेश टोपे यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या बाबतीत गेल्या वेळी 1300 मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती. आता 1400 ते 1500 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे.ऑक्सिजनच्या 450 प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत. उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यान्वित होतील.ज्या दिवशी 700 मेट्रिक टनाच्यावर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरु करु.अशा प्रकारची आधिसूचना (Notification) आरोग्य विभागाने काढली आहे.त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

5 जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे.एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे.गर्दी करुन नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे.

आज राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण संख्या आहे.त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.त्यामुळे शिस्त पाळावीच लागले, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago