माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपाने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला तसेच देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते.याबाबत मी वारंवार बोलत आलो आहे. मात्र आता त्यांना प्राथमिक अहवालातून क्लिनचिट देण्यात आली आहे. खरंतर या सगळ्यामागे खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगच असून त्यांनाच आता गजाआड करा अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
गेल्या सहा महिन्यांपासून मी वारंवार अनिल देशमुख निर्दोष आहेत याबाबत सांगत आलो आहे. मात्र आता तर ते खरे झाले आहे. खंडणीबाबत कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाहीये असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
याउलट परमबीर सिंग यांनीच वाझे यांना नोकरीत समावेश करून घेत मोठ्या पदाची जबाबदारी दिली. शिवाय ते सातत्याने वाझे यांना घेऊनच वरिष्ठ मंत्र्यांबरोबरच अधिकाऱ्यांकडे सुद्धा ब्रिफिंगसाठी जात होते.
शिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती, त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंगच जबाबदार असल्याचेही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे निर्दोष असून त्यांना यामध्ये अडकवून त्यांना त्रास देण्यात आला, असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…