गुन्हे विश्व

माझ्या हॉटेलपेक्षा त्याच्या हॉटेलचा धंदा जास्त

पुण्यातील प्रसिद्ध गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गारवा हॉलेटच्या शेजारी अशोका हॉटेल होतं. या हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार भाच्याला सुपारी देऊन गारबा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात लोणी काळभोर पालिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय २१), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७) करण विजय खडसे (वय २१), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३), गणेश मधुकर साने (वय २०) आणि निखिल मंगेश चौधरी (वय २०, सर्व रा.हवेली) यांची नावं आहेत. या प्रकरणात रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. दौंड) यांची हत्या करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील गारवा या हॉलेटचे मालक आखाडे यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्लाचं सीसीटीव्ही देखील समोर आलं होतं.

हे ही प्रेम प्रकरण आर्मी जवानाच्या अंगाशी; पहिली पत्नी असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट

कशी केली हत्या

रविवारी रात्री आखाडे आपल्या हॉटेलच्या समोर खुर्चीत बसले होते. ते फोनवर बोलत होते. यादरम्यान काही अज्ञात चालत त्यांच्या दिशेने आले व त्यांनी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये आखाडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोण आहेत दोषी

बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल आहे. अशोका हॉटेल गारवा हॉटेलप्रमाणे फार चालत नव्हते. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्याची सुपारी दिली. आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू” असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी (ता. २२) सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयास दिली.

त्या दिवशी 3 लाखांचा गल्ला

गारवाचा दररोजचा व्यवसाय 2 ते अडीच लाखांचा होता. तर अशोकाला साधारँ 50 ते 60 हजारांचा. मात्र ज्यादिवशी गारबा बंद असतं त्या दिवशी अशोकाचा व्यवसाय चक्क 3 लाखांपर्यंत जात होता. गारवा कायमचे बंद पडले तर व्यवसाय वाढेल या विचारातून खेडेकरांनी आखाडेंच्या हत्येची सुपारी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago