दोनपेक्षा जास्त अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा रविवारी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
काय आहे योजना?
वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचं उत्तर प्रदेश सरकारनं निश्चित केलं आहे.
यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्य विधी आयोगानं यासाठीचं विधेयक तयार केलं असून त्याचा पहिला मसुदा तयार आहे. त्यात दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी आणि सरकारी योजना यांचे लाभ न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या सरकारी भत्त्यांवरही अशा पालकांना पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.
दोन अपत्यांबाबतच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, अशीदेखील तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त चारच व्यक्तींचं नाव रेशन कार्डवर घालता येणार असून एकूण 77 योजनांपासून अशा नागरिकांना वंचित राहावं लागणार आहे.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…