अहमदनगर – देशात करोना संसर्गाने रौद्ररुप धारण केल्यानंतर केंद्र सरकारने करोना लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली होती. मात्र देशात केवळ दोनच कंपन्या करोना लसीची निर्मिती करत असल्यामुळे सहाजिकच लसीचा तुटवडा निर्माण झाला. या मुद्दावरून राजकारण तापलं होतं. त्यातच करोना लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी देश सोडून इंग्लंड गाठलं. त्यावेळी त्यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचं म्हटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
करोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे आदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा आरोप केला आहे.
सिरम संस्थेला केंद्र सरकारनेच धमकी दिली होती. त्यामुळे जून महिन्यात 10 कोटी डोस मिळू शकलेले नाहीत, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुश्रीफ यांनी देशातील लसीकरणाच्या मुद्दावरून केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, सिरम संस्था जूनमध्ये राज्य सरकारला १० कोटी लस देणार होती. मात्र केंद्र सरकारने सिरमला धमकी दिल्यामुळे त्या लसी महाराष्ट्राला मिळाल्या नाही. दुसरीकडे आदर पुनावाला यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण सध्या हायकोर्टात आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…