मुंबई : देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत.
एखादे महत्वाचे काम असेल तरच बँकेत जा
ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, SBI बँक ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी शाखेत भेट द्यावी. तसेच बँकेच्या शाखा दुपारी अडीचपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत सकाळी 10 ते पहाटे 1 दरम्यान ते बँकेत गेले तर तुमचे काम होईल.
बँक उघडण्याची वेळ बदलली
SBI शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघड्या राहतील. मित्रांनो, नवीन अधिसूचनेत स्पष्टपणे सांगितले आहे की बँकेची प्रशासकीय कार्यालये आणि 50 टक्के कर्मचारी यांच्यासह संपूर्ण बँकिंग तास पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.
मास्कशिवाय बँकेत प्रवेश नाही
बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावायलाच हवा नाहीतर त्यांना आत जाऊ देणार नाही. इतकेच नव्हे तर आता एसबीआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत फक्त 4 कामे होणार आहेत.
1. रोख ठेव आणि पैसे काढणे
2. चेक संबंधित कामे
3. डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट / आरटीजीएस / एनईएफटीशी संबंधित काम
4. शासकीय चलान
बँकेची फोन सेवा वापरा
ग्राहक एसबीआय (SBI) फोन बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. एसबीआय फोन बँकिंगसाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर संकेतशब्द (पासवर्ड) तयार करावा लागतो. ग्राहक संपर्क केंद्राद्वारे फोनवर दिलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…