अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना गोपालनगरजवळील स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि वैभव तायडे याची मानलेली बहीण यांच्यात बांधकामाच्या वाळुवरुन वाद होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी तायडे रात्री आरोपींकडे गेला होता.
त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपींनी सेंट्रींग राफटरणे वैभवच्या चेहर्यावर मारुन वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टर तपासणीपूर्वी त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले.
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…