ताज्याघडामोडी

मोदींची बदनामी करणाऱ्यांना संजय राऊतांनी खडसावले

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने कोरोना संकटाशी लढण्यासाठी मोदींनी पकड घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी धोरण आखले आहे, ते पाहता मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील, असा मला विश्वास असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

भारताचा अपमान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे का असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल, तर आपण सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभे राहिले पाहिजे.

मोदी जी निती आखतील त्यासाठी आम्ही उभे राहू असा विश्वास मला द्यायचा आहे.

देशाचा नेता किंवा सरकार यांचा अपमान कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर होणे ठीक नाही. असे चित्र परदेशातील प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर रंगवले जात असल्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षडयंत्रही असू शकते, अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे असे आवाहनही यावेळी संजय राऊत यांनी केले.

जी टिपण्णी मद्रास उच्च न्यायालयाने केली तेच आम्ही अनेक महिने सांगत आहोत. ममता बॅनर्जी, विरोधक सांगत होते. जेव्हा याच गोष्टी आम्ही सांगत होतो तेव्हा दिल्लीतील काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

निवडणूक आणि कोरोनाचा काही संबंध नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणूक नाही तिथेही करोना झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. पण बंगाल, केरळ, तामिळनाडूत प्रचारासाठी भाजपने संपूर्ण देशातून लोक तिथे जमा केले. हे चुकीचे नाही, निवडणुकीत अशी रणनीती असते. पण देशात सध्या परिस्थिती ठीक नाही. जर काही लोक कुंभमध्ये गर्दी करत होते आणि कोरोनाचा फैलाव होतो म्हणून आक्षेप घेत असतील, तर पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकीमुळे अजून गर्दी होत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण निवृत्त झालेल्या आयुक्तांना राज्यपाल म्हणून पाठवत राजकीयदृष्या रिटर्न गिफ्ट दिल्याचे कळत असल्याचे यावेळी संजय राऊतांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

19 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago