महाराष्ट्राला कोविड लसीचे 19 लाख 50 हजार पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता लसीचा योग्य वापर करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.पुण्याहून भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला किमान आठवडाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर चुकीचे आरोप करू नये. केंद्राकडून लवकरच 19 लाख 50 हजार लसीचा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या लसीचा वापर योग्यरितीने करावा. करोनाचा काळ हा राजकारण करण्यासाठी नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मुकाबला केला पाहिजे. आम्ही सरकारला सहकार्य करीत आहोत. पण लोकांचे लक्ष वाझे प्रकरणावरून वळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.बापट म्हणाले, पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. मात्र, शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख लसीची गरज आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…